
नवी मुंबई – येथील घणसोली भागातील जनाई कंपाऊंड आणि शिवाजी तलावाजवळ धाड घालून आतंकवादविरोधी पथकाने ५ घुसखोर बांगलादेशींना कह्यात घेतले. ३० मार्च या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
जमाल शेख (वय २२ वर्षे), रेबुल समद शेख (वय ४० वर्षे), रोनी सोरिफुल खान (वय २५ वर्षे), जुलू बिलाल शरीफ (वय २८ वर्षे) आणि महंमद मुनीर महंमद सिराज मुल्ला (वय ४९ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. या सर्वांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मागील वर्षीही आतंकवादविरोधी पथकाने नवी मुंबईमध्ये ९ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. त्यामधील ३ जण बलात्काराच्या गुन्ह्यामधील पलायन केलेले आरोपी होते.
संपादकीय भूमिका :बांगलादेशी घुसखोरांची समस्या समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! |
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !