राज्य सरकारचा निर्णय !

मुंबई – वर्ष १९९२ मधील जातीय दंगल आणि वर्ष १९९३ च्या मुंबईतील साखळी बाँबस्फोटात मृत पावलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना हानीभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दोन्ही घटनांतील पीडितांच्या नातेवाईकांनी शहर आणि उपनगरांतील जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचे आवाहन सरकारने १४ मार्च या दिवशी अधिसूचनेद्वारे केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने या दोन्ही घटनांतील मृत आणि बेपत्ता लोकांच्या वारसांना २ लाखांची हानीभरपाई जाहीर केली. सरकारने सर्व ९०० मृत आणि ६० बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारशांना भरपाई दिली आहे; मात्र इतर हरवलेल्या व्यक्तींचे वारस भरपाई करण्यासाठी सापडलेले नसल्याचे समजते.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक