राज्य सरकारचा निर्णय !

मुंबई – वर्ष १९९२ मधील जातीय दंगल आणि वर्ष १९९३ च्या मुंबईतील साखळी बाँबस्फोटात मृत पावलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना हानीभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दोन्ही घटनांतील पीडितांच्या नातेवाईकांनी शहर आणि उपनगरांतील जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचे आवाहन सरकारने १४ मार्च या दिवशी अधिसूचनेद्वारे केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने या दोन्ही घटनांतील मृत आणि बेपत्ता लोकांच्या वारसांना २ लाखांची हानीभरपाई जाहीर केली. सरकारने सर्व ९०० मृत आणि ६० बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारशांना भरपाई दिली आहे; मात्र इतर हरवलेल्या व्यक्तींचे वारस भरपाई करण्यासाठी सापडलेले नसल्याचे समजते.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव