सगेसोयरे अधिसूचनेची कार्यवाही न केल्यास पूर्ण पराभव होईल ! – मनोज जरांगे पाटील यांची सरकारला चेतावणी’

मनोज जरांगे पाटील

बीड – राज्य सरकारने आरक्षणात सगेसोयरे अधिसूचनेची कार्यवाही करावी, अन्यथा तुमचा पूर्ण पराभव केल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ९ मार्च या दिवशी पिंपळवाडी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. सरकारच्या विरोधात ९०० एकर भूमीवर भव्य सभा घेण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले  की,  सरकारनेही मराठा समाजाचा संघर्ष लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही काय राजकारण करायचे ते करा; पण आमची मुले मोठी झाली पाहिजेत.