Amethi Thug Nafees : २२ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचे भासवून ठग नफीसकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न !

  • कुटुंबाकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न झाला उघड !

  • साधूचे जीवन जगत असल्याचे कुटुंबियांना भासवले !

अमेठी (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमानाकडून फसवणूक करण्याचे एक प्रकरण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी खरौली गावातील एका कुटुंबाला त्यांचा हरवलेला मुलगा अरुण हा साधू बनल्याचे समजले होते. याविषयी वृत्तेही प्रसिद्ध झाली होती. हा मुलगा अरुण नसून तो नफीस असल्याचे आणि कुटुंबाकडून लाखो रुपये लुटण्यासाठी त्याने ‘अरुण’ असल्याचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले आहे. दैनिक ‘जागरण’ आणि स्थानिक यूट्यूब चॅनल यांनी केलेल्या शोधातून हे समोर आले आहे.

१. खरौली गावात एक व्यक्तीचा अरुण नावाचा मुलगा लहानपणी हरवला होता. स्वतःचा मुलगा आता साधू बनून फिरत असल्याचे पाहून त्यांनी त्याला घरी येण्यास सांगितले.  मुलाने साधूचे जीवन त्यागून पुन्हा कौटुंबिक जीवन जगावे, यासाठी कुटुंबीय प्रयत्नशील होते. तसे करण्यास साधूने नकार दिला; पण नंतर त्याने दूरभाष करून सांगितले की, जर त्याला परत मिळवायचे असेल, तर त्याच्या मठात १० लाख रुपये द्यावे लागतील.

२. कुटुंबाला त्यांचा मुलगा परत हवा होता; म्हणून त्यांनी त्यांची भूमी विकून मुलगा परत मिळवण्याची सिद्धता चालू केली. हा संपूर्ण व्यवहार ३ लाख ६० सहस्र रुपयांना झाला; पण ज्या मुलासाठी कुटुंब सर्व काही विकायला सिद्ध होते, तो मुलगा त्यांचा नसून ठग नफीस असून तो गोंडा येथील टिकरिया गावातील असल्याचे उघड झाले.

३. नफीस ज्या गावातील आहे, तेथील काही लोक फसवणुकीच्या आरोपाखाली करागृहातही गेले आहेत. नफीसचा भाऊ रशीद २९ जुलै २०२१ या दिवशी मिर्झापूरच्या सहस्पुरा परसोधा गावात जोगी म्हणून पोचला होता. तेथे बुद्धीराम विश्‍वकर्मा यांचा मुलगा रवि हाही १४ वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्या कुटुंबानेही रशीदला स्वतःचा मुलगा रवि समजून घरात जागा दिली होती. नंतर तोच रशीद लाखो रुपये घेऊन पसार झाला.

४. या वेळी नफीसने फसवणुकीची तीच पद्धत अवलंबली. साधूच्या वेशात तो अमेठीच्या खरौली गावात पोचला आणि त्याने मुलगा हरवलेल्या कुटुंबाला लक्ष्य केले. त्यांनी त्यांच्या भावनांचा वापर करून त्यांना मूर्ख बनवले. २७ जानेवारी या दिवशी खरौली येथे पोचून त्यांनी झारखंडमधील पारसनाथ मठात शिक्षण घेतल्याचे सांगितले.

संपादकीय भूमिका

हिंदूंना फसवण्यासाठी धर्मांध मुसलमानांनी अवलंबलेला आणखी एक जिहाद !