Congress On Ram Mandir : (म्हणे) ‘भाजपवाल्यांनी अयोध्येत २ बाहुल्या तंबूत ठेवल्या आणि त्यांना ‘राम’ संबोधण्यास आरंभ केला !’ – मंत्री के.एन्. राजन्ना

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री के.एन्. राजन्ना यांचे संतापजनक विधान !

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री के.एन्. राजन्ना

बेंगळुरू (कर्नाटक) – अनेक ठिकाणी सहस्रो वर्षांचा इतिहास असलेली श्रीरामाची मंदिरे आहेत; मात्र भाजप निवडणुकीसाठी मंदिरे बांधत आहे. भाजप लोकांची फसवणूक करत आहे. बाबरी मशीद पाडली, तेव्हा मी अयोध्येला गेलो होतो. नंतर त्यांनी २ बाहुल्या तंबूत ठेवल्या आणि त्यांना ‘राम’ संबोधण्यास आरंभ केला. जेव्हा आपण श्रीराममंदिरात जातो, तेव्हा आपल्याला एक विशिष्ट प्रकारची स्पंदने जाणवतात. अयोध्येत मला काहीच जाणवले नाही, असे विधान कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

जेव्हा एखाद्याचा विनाश होण्याची वेळ आलेली असते, तेव्हा त्याची बुद्धी अशा प्रकारचे तर्क देते ! भगवान श्रीराम काँग्रेसचा राजकीय विनाश जनतेच्या माध्यमांतून करणार आहेत, हेच यातून लक्षात येते !