
श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – राहता तालुक्यातील ममदापूर येथील कुरेशी मोहल्ला परिसरात पोलिसांना घेऊन गोरक्षणासाठी गेलेले आप्पासाहेब नाईकवाडे, ईश्वर टिळेकर आणि साईराज बेंद्रे यांच्यावर गोतस्करांकडून आक्रमण करण्यात आले. यामध्ये आरोपींनी ६ डिसेंबर या दिवशी कोयते आणि तलवारीने यांनी आक्रमण केले, तसेच एकाने पिस्तुलाने गोळीबार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आप्पासाहेब नाईकवाडे यांच्या तक्रारीवरून आरोपी नियाज कुरेशी, सद्दाम कुरेशी, आरबाज कुरेशी यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या वेळी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी लोणी पोलीस ठाण्यात हिंदू एकत्रित आले होते.
संपादकीय भूमिकाराज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होणे प्रशासनाला लज्जास्पद ! स्वतःचा जीव धोक्यात घालून गोरक्षण करणार्या गोरक्षकांच्या रक्षणासाठी पोलीस काही करणार का ? |
विस्थापित काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनरागमन कधी ?
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !