
श्रीरामपूर – राहुरी तालुक्यातील कनगर येथील श्री कनकावतीमाता यात्रेनिमित्त पुणतांबा येथून गंगेचे पाणी आणण्यासाठी आलेल्या कावडीवाल्यांना श्रीरामपूर शहरातील सिंधी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काही जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींकडून २५ नोव्हेंबरच्या रात्री मारहाण करण्यात आली. काहीही कारण नसतांना कावडवाल्यांची टाटा झिप ही गाडी अडवून आक्रमण करून त्यांना लोखंडी रॉड आणि दगड यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी कनगर येथील श्री. अनिकेत राजेंद्र घाडगे यांच्या तक्रारीवरून मारहाण करणार्या जिहादी प्रवृत्तींविरोधात २६ नोव्हेंबर या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये कुरेशी आणि शेख नावाचे आरोपी असल्याचे समजते. गुन्हा नोंद होण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबरच्या रात्रीपासून हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
संपादकीय भूमिका :छत्रपतींच्या महाराष्ट्रात कावड यात्रेकरूंवर आक्रमण होणे निषेधार्ह आहे. यातून पोलिसांचा धाक संपल्याचे आणि धर्मांधांमधील हिंसक वृत्ती वाढल्याचे लक्षण आहे. |
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !