देहली येथील २ दिवसांच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ

नवी देहली – भारताला हिंदु राष्ट्र म्हणून कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कृती आराखडा सिद्ध करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसांच्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा प्रारंभ १८ नोव्हेंबर या दिवशी झाला.
शंखनाद, दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठण यांद्वारे कार्यक्रमास आरंभ करण्यात आला. या वेळी उद्घाटनपर भाषणात बोलतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी ‘काशी-मथुरा मुक्ती मोहीम हा महत्त्वाचा राष्ट्रीय विषय आहे’, असे म्हटले.
अधिवेशनात हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी पाठवलेल्या शुभसंदेशाचे वाचन करण्यात आले. या अधिवेशनात जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, देहली, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांतील धर्माभिमानी सहभागी होत आहेत.
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
काही संतांना ‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि काही संतांना ‘पुन्हा जन्म घ्यावा’, असे वाटणे यांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !