पर्यावरणप्रेमींनी पत्राद्वारे केली फौजदारी कारवाईची मागणी !

पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरातील पवना आणि इंद्रायणी या नद्यांच्या पात्रांमध्ये रसायनयुक्त पाणी, मैलायुक्त सांडपाणी सोडले जात असल्याने नद्यांमध्ये सातत्याने फेस येत आहे. याला उत्तरदायी असणार्या महापालिकेच्या पर्यावरण विभागावर आरोप करत फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पर्यावरणप्रेमींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात का येत नाही ? – संपादक)
पवना आणि इंद्रायणी या नद्यांच्या पाण्यावर फेस, तसेच तवंग येतो. यंदाच्या पावसाळ्यात नद्या ५ वेळा फेसाळल्या होत्या. थेरगावातील केजुदेवी बंधारा ते चिंचवड गावातील श्री मोरया गोसावी या दरम्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळत असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरणप्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले की, या नद्यांच्या प्रदूषणाला महापालिकेतील पर्यावरण विभागाचे उत्तरदायी आहे. वर्षानुवर्षे नदी प्रदूषणाविषयी आम्ही प्रशासनास जागे करत आहोत; परंतु त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !