पुणे – राज्यशासन ‘महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक योजना’ राबवते. राज्यातील प्राचीन स्मारके, गड, लेणी, शिलालेख, पारंपरिक कला अशा वारशांचे जतन योजनेतून केले जाते. संरक्षित स्मारकांचे पालकत्व १० वर्षांसाठी घेता येईल. स्मारकांच्या परिसरात सोयी-सुविधा उपलब्ध करणे, जतन, दुरुस्ती, देखभाल, सुशोभिकरण, देखभालीसाठी लोकसहभाग मिळवणे, पर्यटकांची संख्या वाढवणे आदी उपक्रम ‘पुरातत्व विभागा’च्या अनुमतीने करावे लागतील, हे पालट योजनेत केले आहेत, हा निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला. या योजनेंतर्गत स्मारकांची मूळ मालकी ही शासनाकडेच राहील. संरक्षित स्मारकाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाचे पालकत्व घेणार्या संस्थेसह पुरातत्व विभागाशी करार करावा लागेल.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > ‘महाराष्ट्र वैभव योजने’त पालट ! – पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग
‘महाराष्ट्र वैभव योजने’त पालट ! – पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !