Pandav Panchami :  पांडव पंचमी

पांडव पंचमीस ‘ज्ञानपंचमी’, ‘लाभपंचमी’ आणि ‘कडपंचमी’, अशी नावे आहेत. पृथ्वीचे राज्य मिळूनही पांडवांना हे ज्ञान झाले की, ‘कधीनाकधी हा इहलोक सोडावाच लागतो’; म्हणून स्वर्गारोहणासाठी पांडवांनी प्रस्थान ठेवले. तो दिवस कार्तिक शुद्ध पंचमीचा होता; म्हणून त्याला ‘पांडव पंचमी’ म्हणतात. ‘देहाला विराम हा कधी ना कधीतरी द्यावाच लागतो’, हे ज्ञान पांडवांना त्या दिवशी झाले; म्हणून त्याला ‘ज्ञानपंचमी’, असेही म्हणतात. दिवाळीचा उत्सव सरत आला; म्हणून या दिवसाला ‘कडपंचमी’, असे म्हटले जाते.

– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली (साभार : ‘आदिमाता दीपावली विशेषांक’)