भारतावर आम्हला गर्व असून तो कधीही वाईट कृत्य करणार नाही ! – ए.के. अब्दुल मोमेन, परराष्ट्रमंत्री, बांगलादेश

बांगलादेशकडून भारत-कॅनडा वादावरून भारताचे समर्थन

ए.के. अब्दुल मोमेन

ढाका (बांगलादेश) – मला याविषयी अधिक माहिती नसल्याने मी यावर अधिक काही बोलू शकणार नाही; मात्र भारताचा आम्हाला गर्व आहे. तो कधीही हत्येसारखे  कृत्य करणार नाही. भारतासमवेत आमचे मूल्य आणि सिद्धांत यावर आधारित दृढ संबंध आहेत. हे एक दुःखद प्रकरण आहे आणि मला आशा आहे की, ते सौहार्दपूर्णरित्या समाप्त होईल, अशी प्रतिक्रिया बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील वादावर व्यक्त केली असून त्यांनी भारताचे समर्थन केले.


सौजन्य एएनआय