पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्याच्या टोळीतील ६ जणांना अटक  

५ पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे जप्त

अटक करण्यात आलेले खलिस्तानी आतंकवादी

अमृतसर (पंजाब) – पंजाब पोलिसांनी पाकिस्तानात पळून गेलेला खलिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह रिडा याच्या टोळीशी संबंधित ६ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ५ पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या आरोपींनी एप्रिल २०२३ मध्ये पतियाळा येथे २ जणांची हत्या केली होती, तेव्हापासून ते पसार होती. अटक करण्यात आलेले आरोपी अन्यही काही जणांच्या हत्या करण्याची योजना आखत होते, असे प्राथमिक अन्वेषणात समोर आले आहे. पाकमधून मिळणार्‍या सूचनांवरून ही टोळी कारवाया करत होती.

संपादकीय भूमिका

अशांना जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !