
कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन आजरा अन् चंदगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देण्यात आले. आजरा येथे तहसीलदार समीर माने यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ नाथा देसाई, संदीप पाडळे, युवराज पोवार, बामणे, भोसले, माद्याळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंदराव साठे यांसह अन्य उपस्थित होते.

चंदगड येथे श्रीराम सेनेचे श्री. महांतेश देसाई आणि श्री. तुकाराम मरगाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दयानंद पाटील, तसेच अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

सांगली – सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार अनंत गुरव यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी धर्मप्रेमी सर्वश्री महेश चव्हाण, गणेश सगरे, अभिजित कोडग, प्रथमेश बावडेकर, अमित कुटे, शुभम होसमठ आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई उपस्थित होते.
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत