अनेक हिंदु युवतींचे शोषण करून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या धर्मांध टोळी विरोधात कारवाई करावी !

हडपसर येथील धर्मांध टोळीच्या विरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार अर्ज

प्रतिकात्मक छायाचित्र

हडपसर (जिल्हा पुणे) – येथील उरुळी कांचन येथे रहाणारे श्री. अक्षय कांचन हे मांजरी भागात भाजी विकण्यासाठी गेले असता येथील साहील सय्यद हा त्यांच्याकडे बघून खाकरून थुंकणे, शिवीगाळ करणे वगैरे अशोभनीय कृत्य करत असतो. तसेच हिंदू आणि हिंदु युवती यांच्याविषयी अश्लील भाषेत बोलत असे. ‘एस्.एस्. कंपनी’ या टोळीचा तो प्रमुख असून त्याने उघडपणे अनेक हिंदु युवतींवर अत्याचार केल्याचे, तसेच ‘लव्ह जिहाद’साठी अन्य मुसलमानांना प्रोत्साहित करत असल्याचे मान्य केले आहे. तो काही हिंदूंना जिवे मारण्याच्या धमक्याही देत आहे. हे लोक दिवसाढवळ्या कोणत्याही मुलीला उचलून नेऊन तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार करतात. तिचे विवस्त्र अवस्थेतील चित्रीकरण केले जाते आणि नंतर तिला ‘ब्लॅकमेल’ केले जाते. तरी वरील टोळीचा योग्य तो बंदोबस्त करून आम्हाला संरक्षण देण्यात यावे. आमचा काही घातपात झाल्यास वरील टोळीला आणि टोळी प्रमुखाला उत्तरदायी धरण्यात यावे, असा तक्रार अर्ज श्री. अक्षय कांचन यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केला आहे. या तक्रारीची प्रत माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, तसेच पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.

तक्रार अर्जात पुढे म्हटले आहे की,

१. १० जून या दिवशी मी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या जवळ थांबलो असता, साहील सय्यद हा माझ्याजवळ आला. त्याने त्याच्या भ्रमणभाषमधील हिंदु मुलीचे छायाचित्र दाखवले आणि ‘तिच्यावर मुसलमान सामूहिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण करणार’, असे सांगितले. त्याने सांगितले की, आम्ही गायी कापून खातो, तुम्हाला रस्त्यात अडवून मारले असता तुमच्यातील कुणीही तुम्हाला सोडवायला येत नाही. तुम्ही आमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार द्यायला गेल्यास पोलीसही आमचे काही वाकडे करत नाहीत; कारण आम्ही वरूनच दबाव आणत असतो. तुम्हाला आता या भागात रहाणेही आम्ही अवघड करून टाकणार आहोत. (धर्मांधांचा हा उद्दामपणा पोलीस केव्हा मोडून काढतील ? – संपादक)

२. या प्रकाराने काही हिंदूंनी ‘हिंदु समाजाच्या मुलींची अपकीर्ती करू नकोस’, असे सुनावले. त्यावर त्याने प्रत्युत्तर दिले की, आमच्या मुसलमान समाजाच्या वतीने येथे ‘लव्ह जिहाद’ कार्यक्रम राबवण्याची आणि हिंदु मुलींना बाटवण्यासाठी अन् हिंदु मुलींना मुसलमानांकडून त्यांची विटंबना करण्याचे दायित्व, मी स्वीकारले आहे आणि माझ्या मुसलमान समाजाने माझ्यावर विश्वास टाकून ते दायित्व माझ्यावर सोपवले आहे. (असे असेल, तर पोलीस कारवाई करण्यास कुणाची वाट पहात आहेत ? – संपादक)

३. त्यासाठी प्रत्येक शुक्रवारी मशिदीमध्ये बड़ी नमाजनंतर याविषयी आखणी केली जाते. आम्हाला आमच्या समाजाच्या वतीने या कामासाठी मोठे आर्थिक साहाय्यही उपलब्ध करून दिले जाते. मी ‘लव्ह जिहाद’चा पुरस्कर्ता असून मला जर कुणी नख लावले, तर त्याच्यावर कुर्‍हाडीने घाव घालण्याची हमी मला माझ्या समाजाने दिलेली आहे.’’ (पोलिसांनी एवढी माहिती लक्षात घेऊन संबंधितांना कठोर शिक्षा होईल, असे पहावे ! – संपादक)

४. असे म्हणून त्याच्या समवेत असलेले त्याचे इतर ३-४ सहकारी मोठ्याने आरडाओरडा करू लागले. ‘नारा-ए-तकबीर ‘अल्लाहु अकबर’ (अल्ला महान आहे.) अशा घोषणा देऊ लागले आणि तेथे जमलेल्या हिंदूंना लाठ्या-काठ्या, तसेच उलट्या बाजूने कोयते मारणे चालू केले. मलाही त्यांनी मारहाण केली.

५. नंतर वरील व्यक्तीने माझ्या विरुद्ध आणि तिथे असलेल्या हिंदु समाजातील काही लोकांच्या विरुद्ध खोटी तक्रार दिली.

६. आम्हाला आता प्रतिदिन हडपसर येथील ‘एसीपी ऑफिस’ येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत हजेरीला बोलावून तिथेच थांबवले जाते. आम्ही आत बसतो. त्या वेळी साहील सय्यद हा काही धर्मांध मुसलमानांना त्या ठिकाणी घेऊन येतो आणि आमच्याकडे अंगुलीनिर्देश करून ‘यांची ‘विकेट’ टाकायची आहे’, असे बोलतो.

७. ही गोष्ट आम्ही तेथील पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलीस आम्हाला सांगतात की, साहीलचा भाऊ अर्शद सय्यद हा पोलीस विभागात आहे. तो वरून सर्व सूत्रे फिरवत असतो. जीव वाचवायचा असेल, तर येथून घरेदारे सोडून लांब कुठे तरी निघून जा आणि त्याच्या ‘लव्ह जिहाद’ला विरोध करू नका. त्यांनी किती अल्पवयीन मुली नासवल्या आहेत, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे; पण तो ‘ब्लॅकमेल’ करतो, म्हणून पोलिसात तक्रार देण्यास कुणी धजावत नाही, याचा अपलाभ घेऊन तो त्या घरातील इतर महिलांचेही सामूहिकरित्या लैंगिक शोषण करत असतो. (सर्वकाही ठाऊक असूनही पोलीस निष्क्रीय असणे संतापजनक ! महाराष्ट्राचा गृह विभाग याची नोंद घेऊन कारवाई करणार का ? – संपादक)

८. साहील सय्यद आणि त्याचे सहकारी यांच्याकडून ऋषिकेश कामठे, प्रतिक कांचन, प्रकाश खोले यांची हत्या करण्याची धमकी दिली जात आहे. धनश्री म्हस्के या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या महिला अन् तरुणी यांमध्ये याविषयी जागृती करत असतात. त्यामुळे त्यांच्या समवेतही गैरवर्तन करून त्यांचा  घातपात करू’, अशा पद्धतीच्या धमक्या ते आम्हाला देत आहेत.

संपादकीय भूमिका

असा तक्रार अर्ज का करावा लागतो ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?

हिंदु मुलींची विटंबना करण्याचे दायित्व घेतले असल्याचे उघडपणे सांगणार्‍या धर्मांधांना पोलीस कारागृहात कधी डांबणार ?