‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील मान्यवरांचे विचार

साम्यवाद्यांच्या नकारात्मक विचारसरणीच्या प्रभावामुळे देशात हत्याकांडे झाली. कार्ल मार्क्सच्या ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’मधील विचारांना बळी पडलेल्या लोकांनी भारतात साम्यवाद आणला. साम्यवादी विचारसरणी राष्ट्रहिताला हानीकारक आहे. १९८० च्या दशकात बर्याच देशांतील साम्यवाद संपुष्टात आला. रशियातील साम्यवादही संपुष्टात आला. चीनने जरी साम्यवादावर आधारित राज्यपद्धत चालू ठेवली असली, तरी त्याने त्याची मूळ संस्कृती जपली आहे. साम्यवादी विचारसरणी ही भारतीय आचार-विचारांच्या विरुद्ध आहे.

भारतातील साम्यवादी हे भारतीय संस्कृतीचे वैरी आहेत. साम्यवाद्यांनी मुसलमानांना हाताशी धरून हिंदूंचा नरसंहार घडवून आणला. त्यांनी भारतीय संस्कृतीच नष्ट करण्याचा प्रयत्न केला. डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते की, साम्यवाद हा जंगलातील आगीसारखा आहे. डॉ. आंबेडकर हे खरे राष्ट्रवादी होते. त्यांनी सर्वप्रथम हिंदु राष्ट्राचा विचार मांडला होता.
मुसलमान हे मुळातच खूप आक्रमक आहेत. हिंदु-मुसलमान एकत्र नांदणे अशक्य आहे. ‘भारताची विभागणी करायची असेल, तर १०० टक्के मुसलमानांनी पाकिस्तानमध्ये जावे आणि हिंदुस्थान हिंदूंसाठी राहू दे’, असे मत डॉ. आंबेडकर यांनी मांडले होते. आपल्याशी सद्भावाने वागणार्या व्यक्तीशीच आपण सद्भावाने वागले पाहिजे. दुष्टवृत्तीने वागणार्यांपासून सज्जनांचे रक्षण केलेच पाहिजे, ही रामायणाची शिकवण आहे.
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत