
मुंबई, ३१ मे (वार्ता.) – नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळेच्या पहिल्यास दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या राज्यातील १ कोटी ७ लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे. आतापर्यंत ६९ टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
शिक्षणाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता १ ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. या वर्षी ४ लाख २९ सहस्र पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात आली आहे. या वर्षी केरळ राज्याच्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तकांमध्ये नोंदी ठेवण्यासाठी वह्यांची पानेही असणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी पाठ्यपुस्तकांची छपाई नव्याने करावी लागणार आहे.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !