
सातारा, १५ एप्रिल (वार्ता.) – वडिलोपार्जित भूमीवरून न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील किन्हईजवळ गणेशवाडी येथे थोरल्या भावाने सख्ख्या धाकट्या भावाची हत्या केली.
संभाजी घाडगे आणि राजाराम घाडगे यांच्यात वडिलोपार्जित भूमीवरून न्यायालयात खटला चालू आहे. दोघांमध्ये सतत वाद होतात. मागील भांडणाचा राग मनात धरून संभाजी घाडगे यांनी राजाराम घाडगे यांच्या डोक्यात नारळ सोलण्याच्या यंत्राची उलटी बाजू मारली. हा फटका एवढ्या जोरात होता की, राजाराम भूमीवर कोसळले आणि त्यांच्या डोक्यातून अन् तोंडातून रक्तस्राव होऊ लागला. ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिल्यानंतर गर्दी केली, तसेच रुग्णवाहिकेला बोलावलो. उपचारासाठी त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचार चालू असतांना त्यांचे निधन झाले. पत्नी सुरेखा यांनी संभाजी घाडगे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संभाजी घाडगे यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंद झाला आहे.
संपादकीय भूमिकारागाला नियंत्रणात ठेवण्यासाठी नामजपादी साधना करणे आवश्यक ! |
इराणी गायिकेला हिजाबखेरीज गाणे सादर केल्यावरून ७४ फटके मारण्याची शिक्षा !
‘नीट’ परीक्षेसाठी गोव्यात सर्व केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !