पाकिस्तान आज गहू, भाजीपाला यांसारख्या प्राथमिक गोष्टी आयात करण्यास बाध्य का झाला ?

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश वर्ष १९४७ मध्ये स्वतंत्र झाले; पण आज पाकिस्तान अन्नाची भीक मागण्याच्या दशेला पात्र झाला आहे. खरे तर पाकिस्तानकडेही निम्मा पंजाब आहे, जिथे गहू आणि तांदूळ पिकतो. त्यामुळे तो अन्नधान्याविषयी स्वयंपूर्णच असायला हवा; पण सध्या तशी परिस्थिती नाही. असे का ? पाकिस्तान आज गहू, भाजीपाला यांसारख्या प्राथमिक गोष्टीही आयात करण्यासाठी बाध्य झाला आहे. याचे कारण काय ?

१. पाकची दुरवस्था होण्यामागील कारणे

यापूर्वीही मी म्हटले होते, इस्लाममध्ये उत्पत्ती आणि लय या अवस्था आहेत, तिथे पालन म्हणजेच स्थिती ही अवस्थाच नाही. त्यामुळे शेती करणे, कष्ट आणि संशोधन करून काही अभिनव निर्माण करणे, त्याचा विक्रय करून पैसे कमावणे, ही संकल्पनाच नाही. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यावर जोवर हिंदूंची लोकसंख्या बर्‍यापैकी होती, तोवर आणि तोवरच शेती जरा तरी पिकत होती. त्यात गरिबी असल्याने प्रत्येक व्यक्ती ट्रॅक्टर वापरून शेती करू शकत नाही. त्यामुळे बैलांवर अवलंबून रहाणे आले; पण गाय आणि बैल कापून खाण्याचे आकर्षण हे शेतीमध्ये बैल वापरून गव्हाचे उत्पादन घेण्यापेक्षा अधिक मोठे  ! त्यामुळे सुद्धा शेतीची वाट लागायला प्रारंभ झाला.

४ बायका आणि १६ पोरे, खाणारी तोंडे प्रचंड त्याचा परिणाम सुद्धा दिसायला लागला. या सगळ्यावर शेवटची काडी ठेवली गेली, ती अफगाणिस्तानवर रशिया आक्रमणाने. या आक्रमणाचा परिणाम म्हणून मुजाहिदीन, तालिबान हे जन्माला घातले गेले. या कट्टरतेमुळे कष्ट करून पोट भरणे, हा प्रकार संपला. प्रत्येकाला अमेरिकेकडून फुकट मिळणारे डॉलर्स दिसत होते. शेतात कोण राबणार ? त्यापेक्षा मूलतत्त्ववादी बनून मिळणारा सन्मान आणि स्त्रियांचा भोग यांचे आकर्षण अधिकाधिक प्रबळ होत गेले.

२. पाक डबघाईला का आला ?

आज जी अवस्था आहे, ही पुष्कळ आधी झाली असती; पण ३ गोष्टींच्या मुळे झाकली मूठ रहात होती.

अ. एक म्हणजे अमेरिका पाकमध्ये ओतत असलेला पैसा

आ. अमेरिकेने हात आखडता घेतल्यावर चीनने ओतलेला पैसा

इ. याखेरीज बनावट (खोट्या) भारतीय नोटा छापून अर्थव्यवस्थेला मिळणारा आधार.

आता तिन्ही आधार नष्ट झाले आहेत. त्यामुळे इतके दिवस जसे सगळे काही आयात करून भागत होते. आता तेही होत नाही आणि म्हणून आता फाके (फोड) पडायची वेळ आली आहे. २२ कोटी लोकांचा देश आहे. पंजाबसारखी समृद्ध भूमी आहे; पण शेती करून आपले आणि आपल्या देशवासियांचे पोट भरावे, असे यांना वाटत नाही.

मुसलमान कौशल्याची कामे उत्तम करतो. तो प्लंबर आहे, तो वेल्डर आहे, सुतार आहे, तो खाटिक आहे, तो भ्रमणभाष छान दुरुस्त करतो; पण यांपैकी तो काहीही मुळातून निर्माण करू शकत नाही. त्याची मानसिकता सर्व्हिस इंडस्ट्रीची (सेवा पुरवणारे क्षेत्र) आहे; पण त्यात सुद्धा शेती हा एक प्रकारे कष्टाचा उद्योग आहे; परंतु शेती म्हणजे सृजन (निर्मिती) ! पाकमध्ये सृजन करण्याची क्षमता नाही, शून्यातून निर्माण करण्याची क्षमता नाही, त्यांना एके-४७ रायफल द्या. प्रशिक्षण मिळाले नाही, तरीसुद्धा ती बर्‍यापैकी चालवतील. त्याची देखभाल (मेंटेनन्स) छान करतील; पण तशी नवीन बंदूक करा, असे म्हटले, तर त्यांना जमणार नाही. ही त्यांची मर्यादा आहे.

३. इस्लामच्या विकासात सृजनशीलता गुण कुठे ?

माजी क्रिकेटपटू इम्रान खान सत्तेत आल्यावर त्यांनी सर्वांत चांगले काम केले, ते म्हणजे भारताकडून अन्नधान्य आणि भाजीपाला घेणे बंद केले. त्यामुळेच त्यांचे आज बिंग उघडकीस आले आहे. न्यूनाधिक फरकाने भारतातील मुसलमानांची सुद्धा तीच अवस्था आहे. त्यांनाही सृजन जमत नाही, सेवा देणे जमते. सध्या सेवा उद्योग जोरात आहे, त्यामुळे त्यांना चिंता नाही. सर्वजण बांगलादेशच्या कापड उद्योगाचे कौतुक करतात; पण भारताने जर कापूस देणे थांबवले, तर त्यांचे दुकान बंद पडेल. थोडक्यात काय, तर शेतीला म्हणजे सृजनाला पर्याय नाही. सृजनशीलता हा एक गुण आहे आणि इस्लामच्या विकासात तो कुठेतरी हरवून गेला आहे.

–        सुजीत भोगले (साभार : फेसबुक)