(म्हणे) ‘भाजपच्या नेत्यांच्या मुलींनी केले, तर ते ‘लव्ह’, इतरांनी केला, तर ‘जिहाद’!’ – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भाजपवर टीका !

छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

रायपूर (छत्तीसगड) – जेव्हा भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या मुली आंतरधर्मीय विवाह करतात, तेव्हा ते ‘लव्ह’ (प्रेम) असते आणि तेच इतरांनी केले, तर तो ‘जिहाद’ असतो. असे का आहे ? भाजपच्या नेत्यांनीही त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या मुलींवरून हे प्रश्‍न विचारले पाहिजेत, अशी टीका छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपवर केली आहे.

संपादकीय भूमिका

  • लव्ह जिहादमधील ८० टक्के विवाह हे मुसलमान तरुणांकडून ते हिंदु असल्याची बतावणी करून केलेले असतात, तसेच विवाहानंतर हिंदु तरुणींचा छळ केला जातो, त्यांना धर्मांतर करण्यास, गोमांस खाण्यास, नमाजपठण करण्यास, इतकेच नव्हे, तर जिहादी आतंकवादी कारवायांत सहभागी होण्यासाठी बाध्य केले जाते. याविषयी बघेल का बोलत नाहीत ? कि ते त्यांना मान्य आहे ?
  • जर हिंदु मुलींनी अशा प्रकारचे आंतरधर्मीय विवाह करावे, असे जर बघेल आणि काँग्रेसींना वाटत असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलींचे लग्न अन्य धर्मियांशी करू द्यावे, यात अन्य हिंदूंना काही आक्षेप असण्याचे कारण असणार नाही !