
मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – अवकाळी पावसामुळे झालेल्या राज्यातील पिकांच्या हानीसाठीसाठी भरपाईची घोषणा करावी, कांद्यांची खरेदी करावी, या मागण्यांसाठी विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनामे चालू असल्याची माहिती सभागृहात दिली. या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभापतीच्या आसनामुळे येऊन घोषणा दिल्या. त्यानंतर सभात्याग केला.
या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे राज्यातील १ लाख एकर क्षेत्र बाधित झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी हानीची ठिकाणे सांगितली, त्यामध्ये कोकण आणि विदर्भ येथील काही ठिकाणांचा समावेश नाही. सरकारकडून अद्यापही कांद्याची खरेदी चालू करण्यात आलेली नाही, अशी माहिती सभागृहात दिली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या हानीचे पंचनामे युद्धपातळीवर करावेत, यासाठी जिल्हाधिकार्यांना सूचना देण्यात आली आहे. शेतकर्यांना साहाय्य करण्याची सभागृहाची भावना आहे. सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही. राज्यात काही ठिकाणी नाफेडकडून कांद्याची खरेदी चालू आहे. कांदा उत्पादकांनाही सरकार न्याय देईल, असे सभागृहाला आश्वासित केले.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !