पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूचे प्रकरण

मुंबई – सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या घातपाताबाबत सखोल चौकशी करण्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य देण्याविषयी लक्षवेधी सूचना मांडली.

राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघाती मृत्यू झाला नसून घातपात असल्याचे सिद्ध झाले आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही मार्गाने मांडलेल्या भूमिके संदर्भात पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या गुन्हेगारांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच वारीशे यांच्या पश्चात त्यांची आई आणि मुलगा यांना आर्थिक साहाय्य म्हणून शासनाने १ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी आमदार डॉ. राजन साळवी यांनी अधिवेशनामध्ये केली.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !