पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूचे प्रकरण

मुंबई – सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या घातपाताबाबत सखोल चौकशी करण्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य देण्याविषयी लक्षवेधी सूचना मांडली.

राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघाती मृत्यू झाला नसून घातपात असल्याचे सिद्ध झाले आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही मार्गाने मांडलेल्या भूमिके संदर्भात पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या गुन्हेगारांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच वारीशे यांच्या पश्चात त्यांची आई आणि मुलगा यांना आर्थिक साहाय्य म्हणून शासनाने १ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी आमदार डॉ. राजन साळवी यांनी अधिवेशनामध्ये केली.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर