
सातारा, १८ जानेवारी (वार्ता.) – ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक व्यय तपशील १९ जानेवारीपर्यंत सादर करावा. तपशील सादर न केल्यास संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवून पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यास प्रतिबंध केला जाईल ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिले.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि जे बिनविरोध निवडून आले, अशांनी निवडणूक व्ययाचा तपशील ३० दिवसांमध्ये देणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी विहित नमुना आणि प्रतिज्ञापत्राद्वारे तहसीलदारांकडे हा तपशील १९ जानेवारीपर्यंत सादर करायचा आहे. याविषयी ग्रामपंचायत विभागाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्र दिले आहे.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर