
नागपूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – कौटुंबिक कारणामुळे, तसेच व्यसनाधीनतेमुळे काही शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची कारणे पुढे आली आहेत. त्यामुळे पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यावरच आर्थिक साहाय्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. कर्जबाजारीपणा, नापीकता या कारणामुळे आत्महत्या झाली, तरच आत्महत्या करणार्या शेतकर्यांना आर्थिक साहाय्य देण्यात येईल. या व्यतिरिक्त कारणांमुळे आत्महत्या करणार्या शेतकर्यांना शासनाकडून आर्थिक साहाय्य दिले जाणार नाही, अशी भूमिका शंभूराज देसाई यांनी विधानसभेत मांडली. आमदार बळवंत वानखडे यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आत्महत्येचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री देसाई यांनी आर्थिक साहाय्य देण्याविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट केली.
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !