अमरावती गोरक्षण संस्था अंतर्गत ‘पशूधन बचाओ समिती’ची चेतावणी !

अमरावती, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – गेल्या काही मासांपासून अमरावती जिल्ह्यात गोतस्करी आणि कत्तल वाढली आहे; मात्र यावर अपेक्षित कारवाई केली जात नाही. यामुळे हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गोमातेचे रक्षण करावे आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. गोतस्करी अशीच वाढत गेली, तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, अशी चेतावणी अमरावती गोरक्षण संस्था अंतर्गत ‘पशूधन बचाओ समिती’ यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी समितीचे श्री. महेश देवळे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. विजय शर्मा, श्री. मोहन महाराज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे आणि अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकागोतस्करी वाढण्याला पोलिसांची निष्क्रीयताच कारणीभूत आहे ! प्रत्येक वेळी जनतेला चेतावणी देऊन आंदोलन करावे लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! |
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !