
सोलापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – शासन शेतकर्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणार्या काळात शेतकर्यांना विजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी विजेचे सर्व ‘फीडर’ (फीडर म्हणजे विजेचा मुख्य पुरवठा केला जाणारी वाहिनी) सौर उर्जेवर आणणार आहे. यातून ४ सहस्र मेगावॅट विजेचे उद्दिष्ट ठेवले असून यातून येत्या काळात शेतकर्यांना १२ घंटे वीज देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बार्शी येथे विविध विकासकामांच्या ‘ऑनलाईन’ लोकार्पण आणि भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://t.co/kbvsGPvhZE
— DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@InfoPalghar) November 4, 2022
या वेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘‘सोलर फीडरसाठी शेतकर्यांची भूमी हेक्टरी ७५ सहस्र रुपये भाड्याने घेणार असून यातून शेतकर्यांना शाश्वत भाडे मिळेल, तसेच ३० वर्षांनी भूमी परत दिली जाईल. यामुळे शेतकर्यांच्या जीवनात परिवर्तन घडणार आहे.’’
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !