(म्हणे) ‘अयोध्येच्या वेळी शांत होतो; मात्र ज्ञानवापीविषयी चुकीचा निर्णय आला, तर रक्तपात होईल !’

श्रीरामजन्मभूमी खटल्यातील मुसलमान पक्षकारांपैकी एक असणारे हाजी महबूब यांची धमकी !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या निकालाप्रमाणे ज्ञानवापीच्या संदर्भात काही घडले, तर ते योग्य होणार नाही. रा.स्व. संघाला हाताशी धरून सरकार काही चुकीचे करील, तर रक्तपाताविना काही होणार नाही, अशी धमकी श्रीरामजन्मभूमी खटल्यातील एक पक्षकार राहिलेले हाजी महबूब यांनी दिली आहे.

हाजी महबूब पुढे म्हणाले की, काशीमध्ये जे काही होत आहे, ते चुकीचे आहे. तेथे मशीद असून ती प्रलयकाळापर्यंत तेथे राहील. अयोध्येतील प्रकरण वेगळ्या प्रकारचे होते; मात्र आता काशीमध्ये असे झाले (निकाल हिंदूंच्या बाजूने लागला), तर अतिशय वाईट होईल. आम्ही त्या निर्णयाच्या विरोधात वरच्या न्यायालयात जाऊ.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारची उघड धमकी देणार्‍यावर गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात टाकले पाहिजे !
  • हिंदू न्यायालयाचा निर्णय नेहमीच स्वीकारत असतात; मात्र धर्मांध मुसलमान अशा प्रकारची धमकी देतात, हे लक्षात घ्या !