‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पुणे येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’!

यापुढील काळात हिंदु समाज श्री गणेशाचे विडंबन सहन करणार नाही ! – नीलेश निढाळकर, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता

डावीकडून पहिले शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे श्री. ऋषीकेष कामठे, सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, मार्गदर्शन करतांना प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता नीलेश निढाळकर, पुणे जिल्हा वकील आघाडी भाजपचे जिल्हा अध्यक्ष अधिवक्ता संजय सावंत

पुणे – महापालिकेकडून मूर्ती दान घेतल्याचे सांगितले, दाखवते जाते. प्रत्यक्षात दान केलेल्या मूर्ती एका बंद पडलेल्या खाणीमध्ये नेल्या जातात आणि तिथे यंत्राद्वारे विसर्जित केल्या जातात. त्यांची अतिशय अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. यातून श्री गणेशमूर्तींचा अवमान होतो, विडंबन होते. प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रबोधन करण्याचे कारण पुढे करत केवळ हिंदु धर्मातील सणांच्या विरोधातच कार्य करतांना दिसते. यापुढील काळात हिंदु समाज हे सहन करणार नाही, असे परखड मत प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता नीलेश निढाळकर यांनी व्यक्त केले. या धार्मिक पक्षपाताच्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी पुणे येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘पुणे जिल्हा वकील आघाडी भाजप’चे अध्यक्ष अधिवक्ता संजय सावंत, अधिवक्त्या सीमा साळुंके, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ऋषिकेष कामठे, ‘राजा शिवछत्रपती परिवार दुर्गसंवर्धन, महाराष्ट्र’चे अध्यक्ष श्री. प्रमोद बागुल, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आंदोलन करतांना कार्यकर्ते      

समस्त हिंदूंनी संघटित होऊन विरोध करणे आवश्यक ! – सीमा साळुंके, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्या

या वेळी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्या सीमा साळुंके यांनी सांगितले की, अन्य मुसलमान राष्ट्रांकडून ‘पी.एफ्.आय.’ या आतंकवादी संघटनेला पैसा पुरवला जातो, हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे, हे रोखले पाहिजे. नाहीतर याला आपण बळी पडू शकतो. यासाठी समस्त हिंदूंनी संघटित होऊन विरोध करणे आवश्यक आहे. राष्ट्रद्वेषी ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालणे आवश्यक आहे.

केवळ हिंदूंच्या सणाला लक्ष्य केले जात आहे ! – ऋषिकेष कामठे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

आपण श्री गणेश चतुर्थीला शाडू मातीचीच मूर्ती घरी आणायला हवी आणि श्री गणेशाचे शास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विधीवत विसर्जन करायला हवे, असे मत श्री. ऋषीकेष कामठे यांनी व्यक्त केले.

या वेळी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु विधिज्ञ परिषद यांसह अन्य समविचारी संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते असे एकूण ७० जण या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित सर्व अधिकार्‍यांना निलंबित करा, तसेच देशभरात होत असलेल्या हिंदूंच्या हत्यांची चौकशी ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडे देऊन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे श्री. पराग गोखले यांनी सांगितले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता नीलेश निढाळकर, पुणे जिल्हा वकिल आघाडी भाजपचे जिल्हा अध्यक्ष अधिवक्ता संजय सावंत, अधिवक्त्या सीमा साळुंके, श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे श्री. ऋषीकेष कामठे, ‘राजा शिवछत्रपती परिवार दुर्गसंवर्धन, महाराष्ट्र’’चे अध्यक्ष श्री. प्रमोद बागुल, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.