श्रीकृष्णजन्माष्टमीपर्यंत श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीचा परिसर बंद करा !

अखिल भारत हिंदु महासभेच्या अध्यक्षा आणि नेताजी बोस यांच्या पणती राजश्री चौधरी बोस यांची मागणी !

अखिल भारत हिंदु महासभेच्या अध्यक्षा आणि नेताजी बोस यांच्या पणती राजश्री चौधरी बोस (मध्यभागी)

नवी देहली – अखिल भारत हिंदु महासभेच्या अध्यक्षा राजश्री चौधरी बोस यांनी  मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी परिसरातील शाही ईदगाह मशिदीचा परिसर येत्या श्रीकृष्णजन्माष्टमीपूर्वी बंद (सील) करण्याची मागणी केली आहे. (श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंना मिळत नाही, तोपर्यंत अशा मागण्या होतच रहातील. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ते निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक) असे न केल्यास तेथे हनुमान चालिसाचे पठण करण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे.

राजश्री चौधरी बोस या नेताजी सुभाषचंद्र बोध यांच्या पणती आहेत. येथील १३.३७ एकर भूमीच्या मालकी अधिकारावरून न्यायालयात खटला चालू आहे. राजश्री बोस चौधरी यांनी म्हटले आहे की, याविषयी आम्ही न्यायालयात गेलो आहेत; मात्र अद्याप कोणताही निर्देश देण्यात आलेले नाहीत.