भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस ! – आनंद रंगनाथन्

डावीकडून श्री. आनंद रंगनाथन् आणि नूपुर शर्मा

नवी देहली – आजचा दिवस हा भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस आहे. या देशात आता न्यायाची आशा नाही. कसलीही आशा शिल्लक राहिलेली नाही. नूपुर शर्मा यांची येणार्‍या काळात रक्ताला तहानलेल्या जिहाद्यांकडून हत्या होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे’, अशी प्रतिक्रिया ‘स्वराज्य’ संकेतस्थळाचे संपादक आणि प्रसिद्ध लेखक श्री. आनंद रंगनाथन् यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने नूपुर शर्मा याच उदयपूरच्या शिरच्छेदाच्या घटनेला उत्तरदायी असल्याचे विधान १ जुलै या दिवशी केले  होते. त्यावर रंगनाथन् यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.