
सौ. दीपा श्रीहरि मामलेदार यांना सहसाधिका कु. अनुराधा नंदकुमार जाधव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. स्थिरता
कु. अनुराधाताई सत्संगात दृष्टीकोन देते, त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) बोलत आहेत’, असे वाटून ‘ते ऐकत रहावे’, असे मला वाटते. तिच्या बोलण्यात स्थिरता असते. तिच्या आवाजात कधीच चढ-उतार नसतो. ती शेवटपर्यंत एकाच लयीत बोलते.
२. तिच्याकडून आम्हाला सेवा करायला प्रोत्साहन मिळते आणि ती प्रत्येक साधकाला साधनेत पुढे नेण्यास प्रोत्साहन देते.
३. तत्त्वनिष्ठता
ती कोणत्याही साधकाला भावनिक स्तरावर न हाताळता तत्त्वनिष्ठ राहून त्या साधकाच्या चुका सांगते.

४. कु. अनुराधाताईच्या आवाजातील गोडव्यामुळे ‘ती सांगत असलेले साधनेचे प्रयत्न कृतीत आणूया’, असे वाटून तशी कृती होणे
कु. अनुराधाताईच्या आवाजात गोडवा आहे. ताई आमचा प्रतिदिन व्यष्टी साधनेचा आढावा घेते. ती या आढाव्यातून आम्हाला ‘भावजागृतीसाठी कसे प्रयत्न करायचे ? परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव कसा ठेवायचा ?’, हे सांगते. ती सांगत असतांना तिच्या आवाजातील गोडव्यामुळे ‘ते लगेच कृतीत आणूया’, असे मला वाटते आणि तशी कृतीही होते.
गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आम्हाला अशी गुणी दायित्व असलेली साधिका दिल्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– सौ. दीपा श्रीहरि मामलेदार, फोंडा, गोवा. (१६.१२.२०२१)
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !