अक्कलकुवा (नंदुरबार) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या वस्तीवर दगडफेक !

हिंदूंच्या शेकडो वाहनांची जाळपोळ

अक्कलकुवा (नंदुरबार) – येथील धर्मांधांनी १० जून या दिवशी नमाजपठणानंतर हिंदूंच्या वस्तीवर दगडफेक केली. यात त्यांनी हिंदूंच्या शेकडो वाहनांची जाळपोळ केली. या वेळी त्यांनी घोषणाबाजीही केली. दगडफेकीत काही नागरिक घायाळ झाले. या प्रकरणी १५ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आव्हान पोलिसांनी केले आहे.

(सौजन्य : ABP MAJHA)

येथील मुसलमान तरुणांच्या व्हॉट्सअ‍ॅप गटावर ‘१० जून भारत बंद’ असे ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’ ठेवण्यात आले होते. याची चौकशी करून गुन्हे नोंद करण्याची मागणी केली जात आहे.

संपादकीय भूमिका

यावरून धर्मांधांना पोलीस आणि कायदा यांचा जराही धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होते ! अशा घटना रोखू न शकणारे पोलीस किमान यातील दोषींवर कठोर कारवाई तरी करण्याचे धाडस दाखवतील का ?