गुरुपौर्णिमेला ३८ दिवस शिल्लक

शिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय. शिष्य जरी गुरूंवर खूप रागावला असला, तरी गुरु मात्र त्याला सांभाळून घेतात. एका शिष्याने एकदा त्यांच्या गुरूंच्या छायाचित्रावर रागाने जोडे ठेवले, तरी ते त्याच्यावर रागावले नाहीत, तर त्याला पूर्वीसारखेच प्रेम दिले.