काश्मीरमधील ५ सहस्र काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांनंतर आता प्रशासनाने कर्मचार्‍यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर चालू केले आहे. ‘साडेसहा सहस्र कर्मचार्‍यांपैकी ५ सहस्र कर्मचार्‍यांचे स्थानांतर सुरक्षितस्थळी करण्यात आले आहे’, अशी माहिती सूत्रांनी दिली. या कर्मचार्‍यांची भरती जम्मू-काश्मीरसाठी पंतप्रधानांनी वर्ष २०१५ मध्ये घोषित केलेल्या विकास योजनेनुसार करण्यात आली आहे. यासह इतर काश्मिरी हिंदू आणि अन्य राज्यांतून आलेले हिंदू यांनाही सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

सौजन्य रिपाब्लिक टीवी