
मुंबई – मशिदींवरील भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे, असे आवाहन करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषयीचे पत्र घरोघरी पोचवण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/vCoubS5Aix
— Raj Thackeray (@RajThackeray) June 2, 2022
ते म्हणाले, ‘‘मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातीलच नव्हे, तर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोचायलाच हवा. व्यापक लोकसहभागाविना आंदोलन यशस्वी होणार नाही. यासाठी एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. ते पत्र प्रत्येक घरात स्वतः नेऊन द्या.’’
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !