कर्नाटकात मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने चिकमगळुरू, दक्षिण कन्नड, उडुपी, शिवमोग्गा, दावणगेरे, हसन आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये सतर्कतेची चेतावणी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बेंगळुरूमधील पूरस्थितीग्रस्त भागांची पहाणी केली.