ठाणे येथे तलवारी दाखवून दहशत पसरवणार्‍या ५ मुसलमानांना अटक

(प्रतिकात्मक चित्र)

 ठाणे – जिल्ह्यातील दहिसर मोरी आणि ठाकूरपाडा गावात ६ मेच्या मध्यरात्री १२.१५ ते ३.४५ वाजण्याच्या कालावधीत एक मुसलमान महिला आणि ४ मुसलमान यांनी तलवारी, चाकू अन् कुर्‍हाडी घेऊन दहशत पसरवली, तसेच स्थानिकांना घाबरवले. अनेक घरांचे दरवाजे उचकटून रहिवाशांना विनाकारण धमकावले. या प्रकरणी जावेद सलीम शेख, दिलवर फरीद शेख, शाहिद नसीर शेख, साद अहमद आणि मारिया जावेद खान यांना अटक करण्यात आली आहे. या वेळी काही गावकर्‍यांनी धाडस दाखवत आरोपींना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. (स्थानिक रहिवासी समाजकंटक असणार्‍यांना पकडून देतात, तर मग रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावणारे पोलीस काय करतात ? अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक) पोलिसांच्या माहितीनुसार या लोकांच्या टोळीत आणखी काही जणांचा समावेश असून त्यांना पकडण्याचा प्रयत्न चालू आहे. शस्त्र उगारण्यामागे त्यांचा हेतू काय होता, याचाही शोध घेतला जात आहे.

संपादकीय भूमिका

अल्पसंख्य गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! या घटनेवरून त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही, हेच दिसून येते !