
ठाणे – जिल्ह्यातील दहिसर मोरी आणि ठाकूरपाडा गावात ६ मेच्या मध्यरात्री १२.१५ ते ३.४५ वाजण्याच्या कालावधीत एक मुसलमान महिला आणि ४ मुसलमान यांनी तलवारी, चाकू अन् कुर्हाडी घेऊन दहशत पसरवली, तसेच स्थानिकांना घाबरवले. अनेक घरांचे दरवाजे उचकटून रहिवाशांना विनाकारण धमकावले. या प्रकरणी जावेद सलीम शेख, दिलवर फरीद शेख, शाहिद नसीर शेख, साद अहमद आणि मारिया जावेद खान यांना अटक करण्यात आली आहे. या वेळी काही गावकर्यांनी धाडस दाखवत आरोपींना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. (स्थानिक रहिवासी समाजकंटक असणार्यांना पकडून देतात, तर मग रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावणारे पोलीस काय करतात ? अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक) पोलिसांच्या माहितीनुसार या लोकांच्या टोळीत आणखी काही जणांचा समावेश असून त्यांना पकडण्याचा प्रयत्न चालू आहे. शस्त्र उगारण्यामागे त्यांचा हेतू काय होता, याचाही शोध घेतला जात आहे.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्य गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! या घटनेवरून त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही, हेच दिसून येते ! |
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी मीर शाह याला अटक
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस