
नवी देहली – पुढील आठवड्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घोषित करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिला. मार्च २०२० च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. राज्यातील १८ महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदा यांसह अनेक नगरपंचायती अन् ग्रामपंचायती यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्यातील १८ महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेच्या गोंधळानंतर ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.
OBC Reservation: ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात 15 महापालिका, 210 नगरपरिषदांच्या निवडणूका होणार; तुमची नगरपालिका यात आहे का?, घ्या जाणून https://t.co/aFkbmLckJ8#OBC #OBCreservation #SupremeCourt
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2022
अशा परिस्थितीत ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने नवीन विधेयकाद्वारे कायदा संमत करत राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्या याचिकेवर २५ एप्रिल या दिवशी सुनावणी झाली होती. यासंदर्भातील अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi