
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भाजप देशात द्वेषाच्या राजकारणाला प्रोत्साहन देत आहे आहे. त्यामुळे देश आणि राज्यघटना दुर्बल होत आहे. जर असेच चालू राहिले, तर भारत त्याचा मूळ चेहरा हरवून बसेल. त्यामुळे भारताला वाचवण्याची आवश्यकता आहे. भाजपच्या द्वेषी राजकारणाच्या विरोधात देशातील जनतेला जागृत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रथम संपूर्ण उत्तरप्रदेश राज्यात आम आदमी पक्ष ‘तिरंगा शाखा’ प्रारंभ करणार आहे. या शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रत्युत्तर म्हणून असतील, अशी माहिती आपचे राज्यसभेतील खासदार आणि उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष संजय सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ‘येत्या ६ मासांत या शाखा चालू करण्यात येतील. १० सहस्र शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. यांमध्ये प्रारंभी राज्यघटनेची प्रस्तावना वाचून दाखवली जाईल’, अशी माहितीही सिंह यांनी या वेळी दिली.
Lucknow: UP in-charge of Aam Aadmi Party and MP Sanjay Singh announced that the party would start setting up ‘tiranga’ (tricolor) branches in the state from July 1 and appoint 10,000 ‘tiranga’ branch heads in the next six months.
— TOI Lucknow News (@TOILucknow) April 30, 2022
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’