कागल (जिल्हा कोल्हापूर), २३ एप्रिल (वार्ता.) – कागलमध्ये झालेल्या हसन मुश्रीफ यांच्या मिरवणुकीत त्यांच्या समर्थकांनी जिल्ह्याचे नेते समरजीतसिंह घाटगे यांचा एकेरी उल्लेख केला. त्याचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आम्ही निषेध करतो. समरजीतसिंह घाटगे यांनी त्यांच्या कामातून त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे कागलच्या जनतेने त्यांना अपक्ष उमेदवारी असतांनाही भरघोस मते दिलीत. परिणामी आपले अस्तित्व संपणार या भीतीने विरोधकांकडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाच्या कागल तालुक्याचे सरचिटणीस श्री. श्रीधर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, अशी वक्तव्ये करण्यापेक्षा शेतकर्यांना अनुदान का मिळत नाही ? वीज भारनियमन, तसेच जनतेच्या प्रश्नांवर बोलावे. यापुढील काळात अशी वक्तव्ये करणे बंद न केल्यास जनता तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही.
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या संरक्षणासाठी १५ दिवसांत अधिसूचना काढा !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !