भारत इस्लामी राष्ट्र होण्यापासून रोखायचे असेल, तर हिंदूंनी अधिकाधिक मुलांना जन्माला घालावे !  

अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेशमधील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांचे धर्मसंसदेत आवाहन

  • धर्मांधांपेक्षा हिंदूंचे संख्याबळ अधिक आहे. असे असतांनाही हिंदू हे धर्मांधांकडून मार खातात, तसेच जिहादी आतंकवादी भारताचे इस्लामिस्तान करण्याचे स्वप्न पहातात. हे रोखण्यासाठी हिंदूंनी संख्या वाढवणे आवश्यक नसून साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे. पांडव ५ होते; मात्र तरीही श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे ते संख्येने अधिक असणार्‍या कौरवांवर भारी पडले. हे लक्षात घेऊन हिंदूंनी साधना वाढवणे आवश्यक ! – संपादक
  • भारत इस्लामी देश होण्यापासून रोखण्यासाठी आता असलेल्या १०० कोटी हिंदूंनी संघटित होऊन भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे ! यासह समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्यास भाग पाडले पाहिजे ! – संपादक
अखिल भारतीय संत परिषदेचे हिमालयातील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती

उना (हिमाचल प्रदेश) – भारतात लोकशाही असून हिंदू बहुसंख्य आहेत. सुनियोजित योजना आखल्याप्रमाणे मुसलमान अधिकाधिक मुलांना जन्म देत त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत. ‘भारत इस्लामी राष्ट्र होण्यापासून रोखायचे असेल, तर हिंदूंनी अधिक मुलांनी जन्म द्यावा’, असे विधान अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेशमधील प्रभारी (एखाद्या विभागाचे दायित्व सांभाळणारे) यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी येथे आयोजित ३ दिवसीय धर्मसंसदेच्या पहिल्या दिवशी केले. हिमाचल प्रदेश पोलिसांनी ‘धर्मसंसदेत प्रक्षोभक विधाने करू नयेत’ अशी नोटीस पाठवली आहे.

पत्रकारांनी यती सत्यदेवानंद सरस्वती यांना ‘दोनपेक्षा अधिक मुले असणे, हे आपल्या राष्ट्रीय धोरणाच्या विरोधात नाही का?’ असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, ‘‘केवळ दोनच मुले जन्माला घाला’, असे सांगणारा कोणताही कायदा आपल्या देशात नाही.’