(म्हणे) ‘गणेशोत्सवातील ‘डीजे’मुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का ?’ – आमदार अबू आझमी

(‘डीजे’ म्हणजे मोठ्या आवाजातील ध्वनीक्षेपक यंत्रणा)

  • हिंदूंनी सणांच्या वेळी ध्वनीक्षेपक लावला; म्हणून मशिदींवर वर्षभर भोंगा वाजवायला अनुमती मिळते का ? अल्पसंख्य समाजाने बहुसंख्य समाजाला वेठीस धरणे, हे केवळ ‘निधर्मी’ भारतातच होऊ शकते ! – संपादक 
  • मशिदींवरील भोंगे काढण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांना ते अद्याप का काढले गेले नाहीत ? त्यासाठी आझमी यांनी आजपर्यंत काय प्रयत्न केले ? या प्रश्नांची उत्तरे ते देतील का ? – संपादक 
डावीकडून अबू आझमी आणि राज ठाकरे

मुंबई – निवडणुका आणि मतांचे राजकारण यांसाठी राज ठाकरे हिंदु-मुसलमान यांच्यात वैर निर्माण करण्याचा अन् भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनीप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि विवाह समारंभ या वेळी लावल्या जाणाऱ्या ‘डीजे’मुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का ? असा प्रश्न समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर उपस्थित केला.  त्याविषयी कधी राज ठाकरे यांनी आवाज उठवला नाही, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदींमधील ‘डीजे’विरुद्ध आम्ही कधी तक्रार केली नाही. मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी आणि सरबत देऊ. धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको आहे.’’ (यापूर्वी सतत प्रक्षोभक विधाने करणाऱ्या आझमी यांचे हास्यास्पद विधान ! – संपादक)