
‘काही वर्षांपूर्वी मी सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना हिंदु जनजागृती समितीच्या सेवेअंतर्गत संपर्क केला होता. तेव्हा त्यांनी एका साधिकेला माझ्याशी समन्वय करण्यास सांगितले होते. ती साधिका परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करत होती. यातून ‘मनीषाताई साधकांना चांगल्या पद्धतीने घडवत आहेत’, हे माझ्या लक्षात आले. त्या काही मासांपूर्वी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो. तेव्हा मला त्यांच्यातील ‘प्रेमभाव, आपलेपणा, मनमोकळेपणा, मनाची निर्मळता, तीव्र शारीरिक त्रास असतांनाही आनंदी रहाणे, अहंशून्यता, समष्टी सेवेची तळमळ, गुरूंप्रती भाव’ इत्यादी दैवी गुण लक्षात आले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी पुढील कवितारूपी शुभेच्छापुष्प अर्पण करत आहे.

मनीषाताई तीव्र शारीरिक अन् आध्यात्मिक त्रासांतही आनंदी रहाती ।
तळमळीने सर्वांकडून व्यष्टी अन् समष्टी साधना करवून घेती ।। १ ।।
ताई सनातनच्या आदर्श अध्यात्मप्रसारक शोभती ।
कुटुंबीय, साधक, बालक, वयस्कर यांचा त्या आधार असती ।। २ ।।
तत्त्वनिष्ठ राहूनी साधकांना त्यांच्या चुका सांगती ।
साधकांना स्वभावदोषांसह स्वीकारूनी त्यांना प्रेमाने घडवती ।। ३ ।।
तळमळ, भाव, भक्ती अन् श्रद्धा ठेवूनी ताई साधना करती ।
साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेऊनी समष्टीची घडी बसवती ।। ४ ।।
ताई स्वतःस परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांचा धूलीकण समजती ।
ताई अहंशून्यता अन् गुरूंप्रती भावभक्ती यांचे प्रतीक असती ।। ५ ।।
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.२.२०२२)
भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावानंद अनुभवणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (वय ४३ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व सांगणारी एक बोधप्रद कथा !
इतरांचा विचार करणारे आणि सेवाभावी वृत्ती असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. प्रताप वंका !
साधक नामजप करत असतांना त्याला भगवान शिवाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती