हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु समाजाने आता संघटनशक्ती दाखवावी ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

‘कधी थांबणार हिंदू वंशसंहार ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – देशभरात सर्वत्र ‘हिजाब’विषयी चर्चा चालू असतांना बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रभक्त श्री. हर्ष या युवकाची तो ‘हिंदु’ असल्याने हत्या करण्यात आली. श्री. हर्ष यांच्या हत्येमागे ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या कट्टर इस्लामी संघटनांचा हात आहे. यामध्ये ६ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. श्री. हर्ष यांच्याप्रमाणेच अनेक हिंदूंच्या अशा प्रकारे हत्या होत आहेत. या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु समाजाने आता संघटनशक्ती दाखवायला हवी, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘कधी थांबणार हिंदू वंशसंहार ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

श्री. प्रमोद मुतालिक

या विशेष संवादात तमिळनाडू येथील ‘हिंदु मक्कल कत्छी’चे (हिंदु जनता पक्षाचे) अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, बंगाल येथील ‘भारतीय साधक समाज’चे संस्थापक श्री. अनिर्बान नियोगी, कर्नाटक येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. आणि हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनीही सहभाग घेतला.

हिंदूंच्या हत्यांमागे कार्यरत जिहादी धर्मांध संघटनांवर बंदी आणली पाहिजे ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी, तमिळनाडू

श्री. अर्जुन संपथ

तमिळनाडूसह संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांत अनेक हिंदु कार्यकर्ते आम्ही गमावले आहेत. हिंदूंच्या हत्यांमागे कार्यरत जिहादी धर्मांध संघटनांवर बंदी आणली पाहिजे. भारतात ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची आवश्यकता आहे.

हिंदूंवर होणार्‍या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हिंदूंनी पुढे यायला हवे ! – अनिर्बान नियोगी, संस्थापक, भारतीय साधक समाज, बंगाल

श्री. अनिर्बान नियोगी

हिंदूंच्या हत्या झाल्यावर हिंदु मोठ्या प्रमाणात एकत्रित होत नाहीत. दिवसेंदिवस हिंदूंच्या हत्या देशातील सर्वच राज्यांत होत आहेत. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हिंदूंनी पुढे यायला हवे.

‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द कायमचा मिटवण्यासाठी चालू असलेले प्रयत्न हिंदू सहन करणार नाहीत ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कर्नाटक उच्च न्यायालय

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

सतत हिंदुत्वासाठी सक्रीय असलेल्या हिंदूंच्या हत्या करून आपल्या देशात हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. तथाकथित मानवाधिकारवाले हिंदूंच्या हत्यांवर मौन बाळगून आहेत.‘सेक्युलॅरिझम’च्या (निधर्मीपणाच्या) नावाखाली हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत, ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द कायमचा मिटवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत; मात्र हिंदू आता हे सहन करणार नाहीत.

हर्ष यांच्या हत्येतील दोषींवर सरकारने कठोर कारवाई करायला पाहिजे ! –  गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. गुरुप्रसाद गौडा

कर्नाटकसह पूर्ण भारतात धर्मांध शक्तींचा प्रभाव वाढत आहे. कर्नाटकमध्ये धर्मांधांनी नुकतेच बजरंग दलाचे श्री. हर्ष यांची हत्या केली. श्री. हर्ष यांच्या हत्येतील दोषींवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या; मात्र ज्या प्रमाणात हिंदूंनी याविरोधात आवाज उठवायला हवा होता, तो उठवला गेला नाही. हिंदूंनी आता या विरोधात आवाज उठवून जागृती करण्याची आवश्यकता आहे.