
कोल्हापूर, १६ जानेवारी (वार्ता.) – उंचगावसह प्रत्येक गावात सध्या ‘ऑनलाईन’ उतारा देण्याचे काम शासनाने चालू केले आहे; मात्र असे होत असतांना पूर्वी असलेल्या हस्तलिखितातील नावे योग्य असून ‘ऑनलाईन’ उतार्यात मात्र नावात पालट झालेले दिसून येत आहेत. यामुळे नागरिकांना खरेदी-विक्री करता, तसेच बँक कर्जासाठी अडचणीचे ठरत आहे. तरी उंचगावसह प्रत्येक गावातील ७/१२ उतार्यातील ‘ऑफलाईन’वर असणारी नावे ‘ऑनलाईन’वर चुकीची आल्याने ती तात्काळ दुरुस्त करावीत, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने करवीर नायब तहसीलदार विपीन लोकरे यांना देण्यात आले.
या वेळी उंचगाव प्रमुख श्री. दीपक रेडेकर, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, श्री. अरविंद शिंदे आणि श्री. विशाल हांगीरकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’चा मसुदा म्हणजे देवभूमीचे खासगीकरण आणि देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला !