
कोल्हापूर, १६ जानेवारी (वार्ता.) – उंचगावसह प्रत्येक गावात सध्या ‘ऑनलाईन’ उतारा देण्याचे काम शासनाने चालू केले आहे; मात्र असे होत असतांना पूर्वी असलेल्या हस्तलिखितातील नावे योग्य असून ‘ऑनलाईन’ उतार्यात मात्र नावात पालट झालेले दिसून येत आहेत. यामुळे नागरिकांना खरेदी-विक्री करता, तसेच बँक कर्जासाठी अडचणीचे ठरत आहे. तरी उंचगावसह प्रत्येक गावातील ७/१२ उतार्यातील ‘ऑफलाईन’वर असणारी नावे ‘ऑनलाईन’वर चुकीची आल्याने ती तात्काळ दुरुस्त करावीत, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने करवीर नायब तहसीलदार विपीन लोकरे यांना देण्यात आले.
या वेळी उंचगाव प्रमुख श्री. दीपक रेडेकर, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, श्री. अरविंद शिंदे आणि श्री. विशाल हांगीरकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या संरक्षणासाठी १५ दिवसांत अधिसूचना काढा !