कुठे स्त्रीरक्षणासाठी आदर्श असणारे राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे हिंदु धर्म आणि भारत दोघांसाठीही लज्जास्पद ठरणारे सध्याचे जन्महिंदू !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सीतेला रावणाने पळवले; म्हणून रामाने लंकेवर आक्रमण करून सीतेला रावणाच्या तावडीतून मुक्त केले. नरकासुराने बंदी केलेल्या १६,००० उपवर कन्यांना श्रीकृष्णाने त्याच्याशी युद्ध करून सोडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांवर अत्याचार करणार्‍या पाटलाचे हात-पाय तोडले. ‘स्त्रीरक्षण कसे करावे ?’, याचे अनेक दाखले हिंदूंसमोर असूनही भारतात प्रतिदिन स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. कुठे राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे सध्याचे जन्महिंदू ! स्त्रियांच्या रक्षणासाठी काहीही न करणारे असे जन्महिंदू हिंदु धर्म आणि भारत या दोघांसाठीही लज्जास्पद आहेत.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.११.२०२१)