सर्व साधकांना मोक्षपथ दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

२९.७.२०२० च्या रात्री १०.३० वाजता मला झोप येत नव्हती. रात्री १२.३० वाजता मला डोळ्यांसमोर पूर्वीच्या पंतप्रधानांचे तोंडवळे दिसत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘हे मला का दिसतात ?’ तेव्हा पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.
१. समाजाची स्थिती
अ. ‘पूर्वीच्या सरकारने (काँग्रेसने) देश किती वाईट अवस्थेला नेला होता. कुणीही देश आणि धर्म यांच्या स्थितीकडे लक्ष दिले नाही. आताचे सरकार (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली) देशाला पुढे नेण्याचा थोडा तरी प्रयत्न करत आहे, असे वाटते.
आ. पूर्वी काही पिठाधिशांनी धर्मरक्षणाचे काही प्रमाणात प्रयत्न केले आणि करत आहेत. काही संप्रदायही प्रयत्न करत आहेत.
इ. सर्वसाधारण जनतेला यांपैकी काहीच नको आहे. लोकांना ‘केवळ मजा करावी’, असे वाटते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले पालट

अ. परात्पर गुरु डॉ. आठवलेरूपी सूर्य उगवला. त्यांनी सर्वांना साधना सांगितली. नामस्मरणाचे महत्त्व सांगून ते करण्यासाठी प्रयत्न करायले शिकवले.
आ. त्यांनी साधकांना मोक्षाला कसे जायचे, याचे मार्गदर्शन केले.
इ. त्यांनी साधकांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठायला शिकवून संतपदापर्यंत पोचवले.
अशा या आमच्या गुरूंविषयी किती सांगावे ? ‘त्यांच्या चरणी केवळ पडून रहावे’, असे मला वाटते. ‘परात्पर गुरुदेव, हे विचार माझे नसून आपलेच आहे. ते लिहून घेतल्याविषयी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती निलिमा नाईक, फोंडा, गोवा. (२९.७.२०२०)
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !
व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण