सर्व साधकांना मोक्षपथ दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

२९.७.२०२० च्या रात्री १०.३० वाजता मला झोप येत नव्हती. रात्री १२.३० वाजता मला डोळ्यांसमोर पूर्वीच्या पंतप्रधानांचे तोंडवळे दिसत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘हे मला का दिसतात ?’ तेव्हा पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.
१. समाजाची स्थिती
अ. ‘पूर्वीच्या सरकारने (काँग्रेसने) देश किती वाईट अवस्थेला नेला होता. कुणीही देश आणि धर्म यांच्या स्थितीकडे लक्ष दिले नाही. आताचे सरकार (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली) देशाला पुढे नेण्याचा थोडा तरी प्रयत्न करत आहे, असे वाटते.
आ. पूर्वी काही पिठाधिशांनी धर्मरक्षणाचे काही प्रमाणात प्रयत्न केले आणि करत आहेत. काही संप्रदायही प्रयत्न करत आहेत.
इ. सर्वसाधारण जनतेला यांपैकी काहीच नको आहे. लोकांना ‘केवळ मजा करावी’, असे वाटते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले पालट

अ. परात्पर गुरु डॉ. आठवलेरूपी सूर्य उगवला. त्यांनी सर्वांना साधना सांगितली. नामस्मरणाचे महत्त्व सांगून ते करण्यासाठी प्रयत्न करायले शिकवले.
आ. त्यांनी साधकांना मोक्षाला कसे जायचे, याचे मार्गदर्शन केले.
इ. त्यांनी साधकांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठायला शिकवून संतपदापर्यंत पोचवले.
अशा या आमच्या गुरूंविषयी किती सांगावे ? ‘त्यांच्या चरणी केवळ पडून रहावे’, असे मला वाटते. ‘परात्पर गुरुदेव, हे विचार माझे नसून आपलेच आहे. ते लिहून घेतल्याविषयी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती निलिमा नाईक, फोंडा, गोवा. (२९.७.२०२०)
यात काय आश्चर्य !
श्री. विजय लोटलीकर यांची अध्यात्मविषयक जिज्ञासा आणि तिचे समाधान
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !