आतंकवाद्यांच्या भीतीमुळे काश्मीरमधील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत !

  • काश्मीरमध्ये तीन दशकांनंतरही आतंकवाद कायम असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! भारतातील आतंकवादाची समस्या केवळ हिंदु राष्ट्रातील धर्माचरणी शासनकर्तेच कायमची सोडवू शकतात, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा ! – संपादक
  • देशात कुठेतरी अल्पसंख्यांकाना मारहाण झाल्यावर आकांडतांडव करणारे देशातील लोकप्रतिनिधी काश्मीरमधील अल्पसंख्यांक हिंदू आणि शीख यांना ठार मारले जात असतांना, तसेच काही भयभीत होऊन पलायन करण्याच्या सिद्धतेत असतांना चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
प्रातिनिधीक छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्‍या आतंकवाद्यांच्या आक्रमणामुळे काश्मीर खोर्‍यातील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत. श्रीनगरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी मागील ४ दिवसांत २ हिंदू आणि २ शीख यांच्या हत्या केल्यानंतर येथे हिंदू अन् शीख यांच्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेखपुरा येथील हिंदु कुटुंबांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

१. राज्यातील बडगाम जिल्ह्यातील शेखपुरा येथे वर्ष २००३ मध्ये हिंदूंचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र आता या आक्रमणांमुळे आमचे घराबाहेर पाऊलही ठेवायचेही धाडस होत नसल्याचे येथील हिंदूंनी सांगितले.

२. ‘काश्मिरी पंडित संघर्ष समिती’चे अध्यक्ष संजय टिकू यांनी सांगितले की, आतंकवाद्यांच्या भीतीने बडगाम, अनंतनाग आणि पुलवामा या जिल्ह्यांतील अनुमाने ५ सहस्र काश्मिरी हिंदू पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत.