
मुंबई – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची असून भ्रष्टाचाराविरुद्धची भाजपची लढाई चालूच राहील, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई का थांबवली नाही ?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की, एखादी व्यक्ती भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करायला जाते आणि पोलीस त्याला अडवतात. ‘ज्यांच्याविरुद्ध तुम्हाला तक्रार करायची आहे, त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही’, असे कारण सांगितले जाते. स्वतंत्र भारतात अशी कायदा-सुव्यवस्था कधीच पहायला मिळाली नसेल.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !