शिवसेनेच्या वतीने दहीहंडीऐवजी गरजू कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

युवा नेते ऋतुराज क्षीरसागर  जीवनावश्यक साहित्याचे वाटप करतांना, तसेच अन्य

कोल्हापूर, १ सप्टेंबर – छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणारी शिवसेनेची भगवी दहीहंडी यंदा रहित करून ६० गरजू कलावंतांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या वेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, तसेच अन्य उपस्थित होते.